पाकमध्ये तालिबानी आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक

पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील तोरखम येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. टीटीपीने गेल्या मासाभरात पोलिसांवर ३ मोठी आक्रमणे केली.

पाकिस्तान यापूर्वी दिवाळखोर झालेला आहे ! – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

संरक्षणमंत्री आसिफ यांनी या दिवाळखोरीसाठी पाक सैन्य, प्रशासन आणि राजकीय नेते यांना उत्तरदायी ठरवले आहे.

भविष्य अंधःकारमय झाल्याने चरितार्थासाठी विदेशात जात आहेत पाकिस्तानी नागरिक !

पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !

पुराच्या वेळी तुर्कीयेने पाठवलेले साहित्य स्वतःच्या नावाने तुर्कीयेला पाठवले !

पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !

चीनने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे केले बंद !

पाकमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणारा विभाग ‘तांत्रिक कारणां’मुळे बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. चीन सरकारने पाकमधील चिनी दूतावासातील हा विभाग बंद करण्यामागे काही कारणे सांगितलेली नाहीत.

पाक सरकारकडून विजेवरील अनुदान रहित करण्याचा निर्णय

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे.

पाकमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यात घुसून ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपीची हत्या !

ईशनिंदेच्या प्रकरणात हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले व आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.

पाकिस्तानला कर्ज न देता परत गेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पथक !

पाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे !

तुर्कीयेने रहित केला पाकच्या पंतप्रधानांचा दौरा !

काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्‍या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !

पाकमध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी लोक रस्त्यावर !

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.