कन्हाळगाव (जिल्हा चंद्रपूर) येथे अभयारण्य उभारण्यास ४७ गावांतील गावकर्यांचा विरोध
शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे.