
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. कोरोनाचे कारण पुढे करत सत्ताधारी राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
राजन तेली म्हणाले, ‘‘राज्य सरकारने ३ वेळा दिलेल्या मुदतवाढीच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत. मतदारांच्या शंभरहून अधिक नातेवाइकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे.’’
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती