|

जमुई (बिहार) – येथे हनुमान चालीसा पठण करून परतणार्या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी मुसलमानबहुल भागातील मशिदीजवळ दगडफेक करत आक्रमण केले. तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली. यात महिलांसह १० हिंदु कार्यकर्ते घायाळ झाले. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला असून शहरातील इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आक्रमणाच्या प्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे.
Jamui, Bihar: Attack on Hindus Near Mosque while they were Returning from Hanuman Chalisa Recitation – 10 injured
Mu$l|m women & children also allegedly involved in the attack
Negligent police officers suspended
Attacks on Hindu religious processions near mosques are not new.… pic.twitter.com/408T0tQS7I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2025
१. हिंदू स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते १६ फेब्रुवारीला जमुईच्या बलियाडीह गावात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेले होते. पठण करून परतत असतांना मशिदीजवळ त्यांच्या वाहनांवर ३०० ते ४०० धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले.
२. धर्माध मुसलमानांच्या जमावाने हिंदु कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या खिडक्या फोडल्या. कार्यकर्त्यांवर विटा आणि दगड फेकले. या आक्रमणात हिंदू स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीश कुमार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या खुशबू पांडे यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते घायाळ झाले.
३. ‘न्यूज १८ बिहार’च्या वृत्तानुसार आक्रमण करण्यामध्ये मुसलमान महिला आणि मुले हेसुद्धा सहभागी झाले होते.
४. घायाळ झालेल्या खुशबू पांडे म्हणाल्या की, बलियाडीह गावातील भालेश्वर नाथ मंदिरात हनुमान चालीसा कार्यक्रम होता. प्रसाद घेतल्यानंतर परतत असतांना मशिदीपासून थोड्या अंतरावर अचानक दगडफेक चालू झाली. गाडीची तोडफोड करण्यात आली. तिथे ‘अल्लाहू अकबर’च्या (अल्ला महान असल्याच्या) घोषणा दिल्या जात होत्या. मला शोधून मारण्याची योजना होती. तसेच पोलिसांवर आक्रमण करण्याचाही कट होता; मात्र देवाच्या कृपेने मी वाचले.
५. पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर जमुईचे पोलीस अधीक्षक मदन कुमार आनंद यांनी सांगितले की, हनुमान चालीसा पठण करून परतणार्या लोकांविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर तेथे उपस्थित पोलीस पथकाने वरिष्ठ अधिकार्यांना कळवले नाही. त्यांनी स्वतःच प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला आणि मार्ग पालटण्याविषयीही बोलले. आम्ही संबंधित पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि त्यांना निलंबितही केले आहे.
६. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये ८ जणांचा समावेश असून ५० जणांना अनोळखी आरोपी बनवण्यात आले आहे. कारवाई करतांना पोलिसांनी ९ गुन्हेगारांनाही अटक केली आहे. गावात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
संपादकीय भूमिका
|