बांधकाम चालू असलेल्या शाळेवर जमावाने केले आक्रमण

शिलाँग (मेघालय) – रामकृष्ण मिशन शाळेच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर मेघालयातील मावकिनरे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २० जानेवारी या दिवशी अनुमाने २५० लोकांच्या जमावाने बांधकाम चालू असलेल्या शाळेवर आक्रमण करून ती पाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलीस आणि जमाव यांमध्ये झटापट झाली. हिंसक होत असलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या संघर्षात पोलीस आणि रहिवासी असे अनेक लोक घायाळ झाले.
१. वर्ष २०२२ पासून येथे शाळेचे बांधकाम चालू आहे. ही भूमी पोलीस ग्राम परिषदेने रामकृष्ण मिशनला दान केली होती. पोलीस अधीक्षक विवेक सीम म्हणाले की, आता या भूमीवरून २ गावांमध्ये वाद चालू आहे. दुसर्या गावातील लोकांनी या मालमत्तेवर दावा केला आहे.
२. शाळेची भूमी ग्राम परिषदेची आहे, ज्यावर मावकिनरे आणि मावलिन या २ गावांचा सामुदायिक हक्क आहे. जेव्हा जमीन रामकृष्ण मिशनला देण्यात आली, तेव्हा दोन्ही गावांच्या प्रमुखांनी त्यावर सहमती दर्शवली. आता मावलिन गावातील लोकांनी ही भूमी परत मागितली आहे.
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या