मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी भूमी मंदिरांच्या नावावर आहे, तेवढ्या भूमीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या भूमीचा लिलाव केवळ पुजार्यांनाच करता येईल. याखेरीज जी खासगी मंदिरे आहेत आणि जिथे विश्वस्त मंडळ आहे तेथेही पुजार्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्याचा नियम सिद्ध करून निर्देश दिले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथे एका सभेत दिली.
हमने फैसला किया है कि मंदिरों की गतिविधियों पर सरकार का कोई नियंत्रण नहीं रहेगा। मंदिर की जमीनों को नीलाम कलेक्टर नहीं बल्कि पुजारी कर सकेंगे।
निजी मंदिरों के पुजारियों को भी सम्मानजनक मानदेय देने की व्यवस्था की जाएगी। pic.twitter.com/QiMMREi6MI
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 22, 2023
ब्राह्मणांनी धर्माचे रक्षण केले !
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला हे सांगतांना गर्व वाटतो की, ब्राह्मणांनी धर्म, अधात्म, ज्ञान, विज्ञान, योग, आयुर्वेद, परंपरा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे काम केले. त्यांनी यज्ञ, हवन, शास्त्र आदी सर्व सुरक्षित ठेवण्याचे काम केले. त्यांनी संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम केले.
ब्राह्मणों ने हमेशा धर्म और संस्कृति की रक्षा की है इसलिए उनके कल्याण के लिए मध्यप्रदेश में 'ब्राह्मण कल्याण बोर्ड' की स्थापना करेंगे। pic.twitter.com/AtM2z0b3pw
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 22, 2023
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करणार !
व्यास ऋषींनी महाभारत लिहिले, संत तुलसीदास यांनी रामायण लिहिले. प्रत्येक क्षेत्रात असे ब्राह्मण विद्वान आहेत. त्यामुळे आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षक ब्राह्मण आहेत. त्यांच्या कल्याणासाठी ‘ब्राह्मण कल्याण मंडळा’ची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही शिवराज सिंह चौहान यांनी या वेळी केली.
संपादकीय भूमिका
|
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट