सुषमा अंधारे यांनी वारकर्‍यांची क्षमा मागितली !

सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘वारकर्‍यांनी राजकारणात घुसू नये !’

सुषमा अंधारे

पुणे – संत, देवता तसेच वारकरी संप्रदाय यांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘माझ्या वक्तव्यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल क्षमा मागते’, असे म्हणत पत्रकार परिषदेत वारकर्‍यांची जाहीर क्षमा मागितली. तसेच ‘वारकर्‍यांनी राजकारणात घुसू नये’, असा सल्ला या वेळी त्यांनी वारकर्‍यांना दिला. (केवळ मतांसाठी जनता हवी, पण जनतेचा वचक त्यांना नको आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

घटनाप्रेमी सुषमा अंधारे यांना राजकारण्यांच्या चुका जनतेने दाखवलेल्या चालणार नाहीत; मग ही लोकशाही कसली ?