
नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते; परंतु केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे घोषित केले.
यासाठी भाजप नेत्यांकडून आतापर्यंत ७ भेटी घेण्यात आल्या होत्या. या हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. त्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सहा मासात ही समिती हजारे यांच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही करील.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय