रोहिंग्यांना स्वतःहून देशाबाहेर का घालवत नाही ?

‘जेव्हा आम्ही घुसखोरांच्या विरोधात कायदा आणतो, तेव्हा ओवैसी यांच्यासारखे लोक संसदेत गोंधळ घालायला लागतात. रोहिंग्यांवर आम्ही जेव्हा कारवाई करतो, तेव्हा विरोधी पक्ष गोंधळ घालतात. ओवैसी यांनी एकदा आम्हाला लिहून द्यावे, ‘बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका.’ मग मी ते करतो, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना दिले. ‘जर हैदराबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्‍न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.’