पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन करण्यास पुन्हा अनुमती !

मंदिर समितीने पुन्हा अनुमती दिली असली, तरी मंदिर समितीतील धर्मद्वेषी अधिकार्‍यांना पुन्हा मंदिर समितीत कार्यरत रहाण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना वाटते !

‘वारकर्‍यांचा जाणता राजा’, असे म्हणत ठाणे येथील वारकर्‍यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले.

पंढरपूर वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन करणे आवश्यक !

वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्‍या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्‍यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन कसे असायला हवे ते पाहूया …

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या परतीच्या पालखीचे पुण्यात स्वागत

हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे २३ जुलै या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.

गोपाळकाल्यासाठी गोपाळपूरनगरी वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली !

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. मागील ५ ते ६ दिवसांपासून पंढरपूरमध्ये आलेले भाविक गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते.

पंढरपूरचा विशेष विकास आराखडा सिद्ध करू ! – मुख्यमंत्री

पंढरपूर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. वारकर्‍यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असायला हवे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्व सुविधांनी युक्त असेल.’’ 

सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

वारीत सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे काम चालू !

आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्‍या आणि येणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे.

अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर !

ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीमुळे अखंड भक्तीगंगा प्रत्येक वर्षी प्रवाहित होते आणि मनावर भगवंताच्या भक्तीचा संस्कार दृढ होतो. यासाठी समस्त विठ्ठलभक्त संतांच्या चरणी कोटीश: नमन करतात. ‘त्यांच्यासारखी भक्ती आम्हामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी आर्त प्रार्थना !

घायाळ वारकऱ्यांना लागेल ते साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून पंढरपूर येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत मिरजजवळ बोलेरो गाडी घुसल्यामुळे १७ वारकरी घायाळ झाले आहेत. या घायाळ वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे.