श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीस ‘विश्व वारकरी सेने’चा विरोध

असा विरोध का करावा लागतो ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

मिरजेतील ‘वारकरी भवन’चे उदघाटन !

वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका ! – वारकर्‍यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप

आघाडी सरकारने आषाढी यात्रेला अनुमती द्यावी ! – ह.भ.प. निशिकांत शेटे महाराज यांची मागणी

सध्याच्या घडीला औषधोपचारासमवेतच समाजाला मानसिक आधाराची आवश्यकता आहे. आता समाजाचे अन्य व्यवहार हळूहळू पूर्ववत् होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडित करू नये, अशी विनंती सातत्याने होते आहे.

पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात मग पायी वारी का नको ? – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्‍न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.

पायी वारीविषयी निर्णय घेण्यासाठी शासकीय अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी यांची समिती गठीत

ही समिती सर्व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करून पायी वारीविषयी आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी.

आषाढी वारीसाठी नियमांसह अनुमती द्यावी, अन्यथा मंत्रालया समोर आंदोलन करू ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली. निकालानंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात आला, मग राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का ?

पुणे येथील पालखी सोहळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा बैठक

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी पालखी सोहळा रहित करण्यात आला होता. यंदा पालखी सोहळा रहित होणार कि नाही ? पालखी सोहळ्याचे स्वरूप काय असेल ? या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये होईल.

वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. भानुदास यादव महाराज यांचा देहत्याग !

ह.भ.प. यादव यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रति विशेष स्नेह होता. २ डिसेंबर २००१ या दिवशी कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एक वक्ता म्हणून ते सहभागी झाले होते.