श्रीनगर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात एक पोलीस आणि नागरिक घायाळ

श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मियांवरील आक्रमणांकडे दुर्लक्ष ! – भारताची टीका

हिंदु, शीख आणि बौद्ध यांच्यावर पाक, अफगाणिस्तान येथे अनेक दशकांपासून अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्र त्यावर आंधळी, बहिरी आणि मुकी असल्यासारखीच आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा जगाच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने काहीही लाभ नाही. अशी संघटना विसर्जित करणेच योग्य ठरेल !

पाकच्या न्यायालयाकडून जमात-उद्-दवाच्या ३ आतंकवाद्यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

पाकला काळ्या सूचीत घालू नये म्हणून पाक आतंकवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्‍या एफ्.ए.टी.एफ्. संस्थेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा असा प्रयत्न करत आहे, हे जगाला दिसत आहे !

देशद्रोह्यांचा बंदोबस्त करा !

शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी होऊन ही अटक केली गेली नाही. अशाना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोकादायक ठरणार्‍या सर्व देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !

पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा , पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – सुफी इस्लामिक बोर्डाची पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून आतापर्यंत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना आता मुसलमानांच्या धार्मिक संघटनेकडून अशी मागणी होत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर पीएफआय’वर बंदी घालावी !

अशी मागणी का करावी लागते ?

सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.

नायजेरियामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून ११० शेतमजुरांचा शिरच्छेद

बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने ११० शेतमजुरांना दोरीने बांधून त्यांची गळे चिरून निर्घृण हत्या केली आहे. हे शेतमजूर एका शेतात काम करत होते.

मंगळुरू येथे आणखी एका ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्‍या ठिकाणी लिखाण झाले नसते ! आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिकमधील एक सैनिक हुतात्मा, तर १० जण घायाळ

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.