याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत सरकारकडून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी गुलमर्ग, रायपूर, जोधपूर, चकराता, अनूपगड आणि बिकानेर येथे प्रशिक्षण केंद्रे बनवण्यात आली आहेत. या केंद्रांचा उद्देश काश्मीरमधील स्वतंत्रता आंदोलनाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरमधील आंदोलनाचा संबंध आंतरराष्ट्रीय आतंकवादाशी जोडण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या सदंर्भात संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांना कागदपत्रे सादर करण्यात येतील, अशी माहिती पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली आहे. शाह महमूद कुरैशी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसूफ आणि मानवाधिकार प्रकरणांचे मंत्री शिरीन मंजारी यांनी पत्रकार परिषदेत भारतावर हा आरोप केला.
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !