केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत !  डॉ. बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

ब्रेक निकामी झाल्याने घारपी घाटात एस्.टी.ला अपघात

घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस  घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला भीषण अपघात

केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला कर्नाटकातील अंकोला येथे भीषण अपघात झाला असून त्यांच्या पत्नी आणि स्वीय सचिव यांचा मृत्यू झाला आहे, तर श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर आहे.

अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयात ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’’

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.

मुंबई शहरातील शेकडो रुग्णालयांकडे अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही !

अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्‍या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?

गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा !

गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.

विसरवाडी (जिल्हा नंदुरबार) येथे ७ गायींना ट्रकची धडक

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ४ जानेवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बसलेल्या ७ गायींना ट्रकने जोरदार धडक दिली.