सेऊल (दक्षिण कोरिया) येथे हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरी : १५१ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे २९ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोविन उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १५१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक जण घायाळ झाले. अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू आला.

वाहनाचा विमा उतरवण्याच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !

प्रत्येक वाहनधारकाने स्वत:च्या वाहनाचा विमा उतरवला आहे ना, याची निश्चिती करावी. विम्याच्या कागदपत्रांच्या मूळ, तसेच छायांकित (झेरॉक्स) प्रती वाहनात ठेवाव्यात अन् छायांकित (झेरॉक्स) प्रती घरीही ठेवाव्यात.

वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आग !

वसई येथे २४ ऑक्टोबर या दिवशी चपलांच्या गोदामाला आग लागली. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी गोदामाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

परिवहन विभागाच्या कारवाईत १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्समधील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळले !

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांतील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळून आले.

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

जालना येथे आयशर-रिक्शाच्या भीषण अपघातात ५ ठार, २ घायाळ !

जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा गावाजवळ १७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परवीन शहा, आलिया शहा मुस्कान शह, कैफ शहा आणि मनीषा तिरुख अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू  

केदारनाथपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला.

दुर्गापूजा पहाण्यास जाणार्‍या भाविकांना बसची धडक लागून तिघांचा मृत्यू

आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !