मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी !

मुंबईकडून पुण्‍याच्‍या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्‍या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्‍यापर्यंत या रांगा लागल्‍या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्‍याने ती जळून खाक झाली आहे.

लुधियाना (पंजाब) येथे वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू

वायू गळतीच्या घटनेमुळे अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन हा संपूर्ण परिसर बंद केला. या वायू गळतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संशोधनात चिंता वाढवणारा निष्कर्ष !

समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासासाठी लागणारा वेळ अल्प झाला आहे; मात्र सतत होणार्‍या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांकडून सुरक्षेसंबंधी सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन

सुरक्षेसंबंधी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर विविध घटनांमध्ये ३६ जणांचा बुडून मृत्यू ! यामध्ये चालू वर्षाच्या ४ मासांत ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांचाही समावेश आहे. सर्व घटनांमध्ये बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश आहे.

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस रस्‍त्‍यावर भीषण अपघात !

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस रस्‍त्‍यावर खोपोली ‘एक्‍झिट’जवळ २७ एप्रिल या दिवशी १२ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. १२ गाड्या एकमेकांवर जोरात आदळल्‍या असून अपघातात गाड्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, तर काही जण घायाळ झाले आहेत.

जपानच्या ‘लँडर’ची चंद्रावर उतरण्याची मोहीम अपयशी !

जपानला भारताच्या ‘विक्रम लँडर’सारख्या अपघाताला तोंड द्यावे लागले आहे. त्याच्या ‘हाकुतो-आर् मिशन १’ नावाच्या ‘लँडर’ला चंद्राच्या भूमीवर उतरवण्याची मोहीम अपयशी ठरली आहे.

गोवा : काणकोण मामलेदार कार्यालयातील आगीत अनेक जुनी कागदपत्रे जळून खाक

राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

एस्.टी.चा गलथानपणा !

बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्‍या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.

पुण्‍यात नवले पुलाजवळ ट्रक आणि ‘ट्रॅव्‍हल’ बसचा भीषण अपघात !

कोल्‍हापूरवरून मुंबईच्‍या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक बस जात होती. त्‍या वेळी साखरेची वाहतूक करणार्‍या ट्रकने पाठीमागून बसला जोरात धडक दिली.

समृद्धी महामार्गावर अडीच मासांत ४२२ अपघात : ४७ जणांचा मृत्यू !

काही मासांपासून चालू झालेल्या समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण ४२२ अपघात झाले आहेत.