मालवण येथे वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी पर्यटन व्यावसायिकांचे आंदोलन
कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.
कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने भारतीय घटनेचे कलम २४३ (के) आणि २४३ (झेड्. ए.) यांनुसार राज्यातील ११ नगरपालिका मंडळे, पणजी महानगरपालिका, ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आणि नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक ३ मासांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रकल्प या जागेतून रहित करून दुसर्या जागेत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया मी चालू करीन’, असे आश्वासन कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी १८ जानेवारीला येथे झालेल्या सभेच्या वेळी दिले.
ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्न आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन !
सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.
वेंगुर्ला तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशी गावासाठी वर्ष २०१७ – २०१८ मध्ये भारत दूरसंचार निगमचा (बीएस्एन्एल्) मनोरा (टॉवर) संमत झाला आहे. असे असूनही ३ वर्षांमध्ये केवळ त्याच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झाले आहे.
वाहनचालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.