आमरण उपोषण करणार्या खाण कामगारांपैकी दोघांची प्रकृती ढासळली : जिल्हा रुग्णालयात भरती
मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.
मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.
अशाप्रकारे धमकी दिली जाण्यास गुन्हेगार धजावतात यावरून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. असा धाक निर्माण होण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
हुतात्म्यांच्या पुतळ्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष नाही, असा याचा होतो. संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित !
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारी दिवशी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
देशात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. महिला आणि मुलींना संरक्षण यांसाठी अनेक कायदे देशात अस्तित्वात आहेत. महिलांनी या कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण !
पणजी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा निषेध करण्यासाठी ‘पणजी म्युनिसिपल मार्केट टॅनंट असोसिएशन’ याच्या नेतृत्वाखाली पणजी बाजारातील दुकानदारांनी १४ जानेवारी या दिवशी दुकाने बंद ठेवली.
ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती ताळगावच्या आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) बुडित क्षेत्रात घर आणि भूमी जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शांताराम नागप यांची प्रकृती चिंताजनक आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या मासात मार्गी लागल्यानंतर दोन मासांत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.