केंद्र सरकारच्‍या ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुणे येथील आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास !

भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्‍वेस्‍थानकांचा पुनर्विकास करण्‍याचे घोषित केले आहे.

‘अमृत भारत स्‍थानक योजने’त महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश !

देशातील रेल्‍वेस्‍थानकांच्‍या आधुनिकीकरणासाठी राबवण्‍यात येणार्‍या ‘अमृत भारत योजने’चा ६ ऑगस्‍ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते शुभारंभ झाला. या योजनेत महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला विश्वगुरु बनवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. यात कोल्हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्वे चालू करण्यासाठी देहली येथे २ बैठका झाल्या आहेत.

सरकारी कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यास बसपच्या धर्मांध खासदाराचा विरोध !

भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्‍या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

कर्जत ते भिवपुरी स्‍थानकांच्‍या दरम्‍यान रेल्‍वे रुळांखाली मोठा खड्डा !

मागील काही दिवसांत परिसरात मुसळधार पाऊस झाल्‍याने रुळांवर पाणी साचले होते. पाणी ओसरल्‍यानंतर तेथे खड्डा पडला.

कराड-निपाणी-बेळगाव रेल्‍वेमार्गाचे काम चालू करा ! – रेल्‍वेमंत्र्यांना निवेदन

हा रेल्‍वे मार्ग पूर्णत्‍वास गेल्‍यास कर्नाटक-महाराष्‍ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे. या प्रसंगी महाराष्‍ट्र भाजपचे उपाध्‍यक्ष श्री. अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप अध्‍यक्ष श्री. संजय पाटील उपस्‍थित होते.

कोकण रेल्वेमार्गावर ८ ऑगस्ट या दिवशी ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

जिल्ह्यातील संगमेश्वर रोड ते रत्नागिरी या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी मंगळवार, ८ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत मेगाब्लॉक (अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे.

नांदगाव (सिंधुदुर्ग) रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ थांबणार

‘कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ या गाडीला थांबा मिळावा’, अशी मागणी मंत्री राणे यांनी केली. या मागणीनुसार रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ही गाडी नांदगाव येथे थांबवण्याची अनुमती दिली.

नगरसुल रेल्वेस्थानकात महत्त्वाच्‍या रेल्‍वे गाड्यांना थांबा मिळावा !

हे निवेदन त्‍यांनी अन्‍न  पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्‍वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्‍य राज्यमंत्री भारती पवार  नगरसुल रेल्वे स्टेशन मास्तर गौतम आहेरे, रेल्‍वे सदस्य समीर समदडिया यांना निवेदन दिले आहे.

रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !

रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.