‘आंचिम’च्या जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार

१६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्‍या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

चीनने लडाख सीमेवरून १० सहस्र सैनिक मागे घेतले !

चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र  सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.

राज्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे लाक्षणिक उपोषण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत.

गोव्याला कोरोना लसीचे २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा राज्याला १३ जानेवारी या दिवशी सकाळी कोरोना लसीचे २ सहस्र ३५० ‘वायल’चे प्रत्येक १० ‘डोस’ म्हणजेच २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून लस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाकडून तीनही कृषी कायद्यांना स्थगिती !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांना पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली आहे. कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

संशयावरून आरोपीला अटक करणे, हा शेवटचा पर्याय असावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील पोलीस या नियमाचे प्रतिदिन उल्लंघन करून शेकडो घटनांत निरपराध्यांचा छळ करत असतात ! सनातनच्या काही निर्दोष साधकांनी ४ वर्षे हा छळ भोगलेला आहे. हे लक्षात घेता न्यायालयाने अशा पोलिसांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !

परदेशातील पक्ष्यांमुळे परभणी येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव ! – प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय 

मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्‍यावर येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.

महिला या ऊर्जेचा स्रोत असल्याने त्यांना कोणीही न्यून लेखू नये ! – माजी केंद्रीय मंत्री उमा भारती

महिला या ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांना कोणीही न्यून लेखू नये. देशातील कोणत्याही महिलेला पुरुषासमोर पैशांसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी आर्थिक स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

‘बार्क’चे माजी अधिकारी दासगुप्ता मुख्य सूत्रधार ! – पोलिसांचा आरोप

मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत !  डॉ. बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले.