बंगालमध्ये भाजपच्या खासदाराचे घर आणि कार्यालय यांवर १५ गावठी बॉम्बद्वारे आक्रमण

बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ?

कळंगुट येथे चालू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ला प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर टाळे !

या गोष्टी पोलीस आणि प्रशासन यांना दिसत नाहीत का ? सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे जागी आहेत म्हणून बरे आहे !

‘मिग-२१’च्या अपघातात ग्रुप कॅप्टनचा मृत्यू

उडत्या शवपेट्या असलेली भारतीय वायूदलाची मिग-२१ विमाने ! आणखी किती वर्षे असे अपघात होत रहाणार ?

सचिन वाझे यांच्या अटकेचा सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम नाही ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सचिन वाझे यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू आहे. जे चुकीचे काम किंवा पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी सहकार्य करू.

अधिकोषांच्या गोपनीय डाटा चोरीप्रकरणात पुणे येथे ९ जणांना अटक !

अधिकोषांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा गोपनीय डाटा अवैध मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे.

बैरागी कॅम्पमधील सर्व आखाड्यांना ७ दिवसांत सर्व सुविधा देणार ! – दीपक रावत, कुंभमेळा अधिकारी

हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?

अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला १० वर्षांचा कारावास !

बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सी.बी.आय्. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.

श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.

रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !