
धनबाद (झारखंड) – समाजात साधना करणारे आणि ती न करणारे या सर्वांनाच आनंदप्राप्तीची अपेक्षा असते. आज लोकांकडे पुष्कळ पैसा, महागडी गाडी असू शकते; परंतु घरात सुख, शांती आणि चांगली निद्रा हवी असेल, घरात एकमेकांशी चांगले संबंध हवे असतील, तर ते पैशाने मिळू शकत नाहीत. त्यासाठी साधनाच करावी लागते, म्हणजे केवळ अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील युवकांसाठी मागील वर्षी दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि अध्यात्म’ या विषयावर ‘ऑनलाईन’ युवा धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आले. या वर्गाला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पू. सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुलिका शर्मा यांनी केले. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधनेच्या संदर्भात इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते मी करतो’, या प्रयत्नांचे आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी असलेले साम्य !