कपडे वारंवार धुतल्याने होत आहे पर्यावरणाची अतोनात हानी ! – रसायनतज्ञांचा निष्कर्ष

पूर्वी हाताने कपडे धुतले जात असत. त्यात काळानुरूप पालट होत गेला आणि आता कपडे धुण्याची यंत्रे आली आहेत. त्यामुळे कपडे धुणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे; परंतु नियमित कपडे धुतल्याने मग ते हाताने असोत की, धुलाईयंत्राने (‘वॉशिंग मशीन’ने), त्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे रसायनतज्ञांनी म्हटले आहे.

देशात को-ऑपरेटिव्ह अधिकोषांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल !

वर्ष २०२०-२१ मध्ये २१७ घोटाळे ! देशभरात १ सहस्र ५३४ नागरी सहकारी बँका आहेत. त्यांपैकी एक तृतीयांश बँका महाराष्ट्रामध्ये आहेत. 

आरोग्य भरतीची परीक्षा पारदर्शक होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्रातील आरोग्य भरतीच्या प्रक्रियेत कोणताही चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ही परीक्षा पारदर्शक होईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

सहस्रो उमेदवारांच्या मनस्तापाला कारणीभूत ठरलेल्या ‘न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेड लिमिटेड कंपनी’वर कारवाई करण्याऐवजी पुन्हा त्याच आस्थापनाकडे परीक्षेचे दायित्व !

राज्यातील आरोग्य विभागातील ६ सहस्र १९२ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ८ लाख ६६ सहस्र ६६० उमेदवारांनी अर्ज भरले होते; मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा रहित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.

कोकण विभागात कृषी पर्यटनासाठी मोठी संधी ! – मनोज रानडे, कोकण विभागीय उपायुक्त

सध्या ४० कृषी पर्यटन केंद्रांना संमती देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भायखळा कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाची लागण

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतांना भायखळा येथील महिलांच्या कारागृहातील ३९ बंदीवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ६ मुलांसह एका गर्भवती महिला बंदीवानाचाही समावेश आहे.

‘ऑनलाईन मोडी लिपी’ कार्यशाळेचे आयोजन !

या कार्यशाळेत मोडी लिपीचा उदय, विकास, पुनरुज्जीवन, प्रशिक्षण, अर्थार्जनाचे साधन आणि वर्णमाला यांविषयी मार्गदर्शन केले जाईल.

घरीच स्थानबद्ध करण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश !

हृदयावरील शस्त्रकर्म झाले असल्यामुळे प्रकृती ठीक होईपर्यंत घरी स्थानबद्ध ठेवण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सचिन वाझे यांनी याविषयीचा अर्ज न्यायालयात केला आहे.

महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले !

रस्त्यांच्या कामांविषयी न्यायालयाला सातत्याने सांगावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनाविषयीचे नियम पाळून ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे