राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी तोडण्यावरून विधानसभेत गदारोळ !

कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबूकवरून त्यांच्या आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या केली. याचे पडसाद ७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

देशातील सर्वांत मोठा औषध निर्माण प्रकल्प रायगड येथे विकसित करण्याचा केंद्रशासनाचा प्रस्ताव !

केंद्रशासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाद्वारे रायगड येथे औषध निर्माण उद्योग समूह विकसित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राकडे करण्यात आला आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या भूमीच्या अपहाराप्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंद ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, तर वक्फ मंडळाला देण्यात येणारे अनुदान सरकारने त्वरित बंद करावे !

थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला ! – आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

भ्रष्टाचारामुळे शासकीय आस्थापने डबघाईला आणणार्‍यांवर सरकार कारवाई कधी करणार ?

शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ? – दिवाकर रावते, शिवसेना

कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये ‘महार रेजिमेंट’ इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला ‘महार रेजिमेंट’चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण केले होते.

होळीविषयी आक्षेपार्ह वाक्य असल्याने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला सामाजिक माध्यमांतून विरोध !

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य पडद्यावर दिसते. हे वाक्य हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य असल्याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे

जत (जिल्हा सांगली) तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री  निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष ! – काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री होत असून निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले आहे.

जानेवारी २०२२ मध्ये ९२ माता, तर १ सहस्र १६६ अर्भक यांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही राज्यात अर्भक आणि माता यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असणे लज्जास्पद आहे !

पत्रात महिलेचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी विरोधी पक्ष आक्रमक !

स्थानांतराविषयी पाठवलेल्या पत्रामध्ये महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख करतांना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी महिलेच्या पदनामाचा उल्लेख केला. यामुळे महिलेची अपकीर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देशमुख यांना निलंबित…

डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ (जीवनवाहिनी) असून ही लाईफलाईन जगवायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केले. मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.