भ्रष्टाचारामुळे शासकीय आस्थापने डबघाईला आणणार्यांवर सरकार कारवाई कधी करणार ? – संपादक

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – आमची सत्ता असतांना ‘महावितरण’ची तिन्ही आस्थापने नफ्यामध्ये होती. ४२ कोटी रुपयांची थकबाकी असूनही महावितरण नफ्यात होती. थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला आले आहे, अशी टीका भाजपचे आमदार आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना त्यांनी वरील टीका केली.
या वेळी चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, ‘‘वीजदेयकांच्या वसुलीचा ताळमेळ लागत नव्हता; म्हणून आम्ही त्रयस्थ समिती नियुक्त करून त्याविषयीचा अहवाल घेतला. त्यात शेतकर्यांच्या नावाने चुकीची देयके दाखवण्यात येत असल्याचे आढळून आले. आम्ही शेतकर्यांची वीजजोडणी तोडली नाही. थकबाकीमुळे तोटा होत असल्याचे सांगून महाराष्ट्राची अपकीर्ती करू नका.’’
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !