इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.