जिंकलेल्या जागांनुसारच महायुतीच्या जागांचे वाटप ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

मुंबई – वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षांचे उमेदवार निवडून आले होते, त्या प्रमाणेच महायुतीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप होईल, असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘इंडिया टुडे’ला २५ सप्टेंबर या दिवशी दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. ‘इंडिया टुड’चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी ही मुलाखत घेतली. वर्ष २०१९ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त ८८ जागांच्या वाटपाविषयी चर्चा होईल, असे या वेळी अजित पवार म्हणाले.