संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनांच्या अर्थसाहाय्यात वाढ !
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांच्या अर्थसाहाय्यात प्रतीमास ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.