
रत्नागिरी – ३ जूनला मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन ओडिशामधील रेल्वेदुर्घटनेमुळे रहित करण्यात आले होते. आता या गाडीचे उद्घाटन २७ जूनला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दिवशी एकूण ५ वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे.
Vande Bharat : मुंबई-मडगावसह ५ वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण, कोणत्या मार्गावरील प्रवास वेगवान? जाणून घ्याhttps://t.co/Nal3xJ4gUG#VandeBharat #VandeBharatExpress
— Maharashtra Times (@mataonline) June 27, 2023
कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी गोवा येथून धावेल. २७ जून या दिवशी शुभारंभानंतर या गाडीच्या नियमित फेर्या २८ जूनपासून चालू होणार आहेत. संभाव्य पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबईहून गोव्याला जातांना ही गाडी पहाटे ५.३२ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वा. मडगाव (गोवा) येथे पोचेल. गोव्याहून परत जातांना मडगावहून दुपारी १२.२० वाजता निघेल आणि रात्री १०.२५ वा. मुंबईला पोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !