
मुंबई – उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्पष्ट केले आहे.
ज्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठापुढे या प्रकरणाची सुनावणी होत आहे त्यामधील न्यायमूर्ती एम्.आर्. शहा १५ मे या दिवशी निवृत्त होत आहेत. १३ मे या दिवशी शनिवार, तर १४ मे या दिवशी रविवार आहे. त्यामुळे हा निकाल ११ किंवा १२ मे पर्यंत होण्याची शक्यता आहे. एका पक्षातील बहुसंख्य आमदार बाजूला होऊन त्यांना पक्षाची मान्यता देण्याचा दुर्मिळ निर्णय यापूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या निर्णयावरूनही राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या