अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !

मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

गोमंतकियांना टोमॅटो दरवाढीचा फटका बसणार नाही ! – कृषीमंत्री नाईक 

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला २ किलो टोमॅटो विनामूल्य देण्याची मागणी विधानसभेत केली. या मागणीवर बोलतांना कृषीमंत्री रवि नाईक यांनी ही माहिती दिली.

गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?

गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुसलमान व्यापार्‍यांमुळे गौहत्तीमध्ये भाज्यांचे दर वाढले ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्‍चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्‍यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

पाकच्या गावांमध्ये विनामूल्य शिधा वाटपात होत आहे जनतेची फसवणूक ! – गावकर्‍यांचा आरोप

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !

पाकिस्तानात विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत ४ वृद्ध ठार

एका ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना रांगेत ठेवण्यासाठी लाठीमार केला. नागरिकांनी सरकारी वितरण केंद्रांवर गैरसोय असल्याचा, तसेच अल्प धान्य मिळत असल्याचा आरोप केला.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानचे पंतप्रधान रमझान मासात गव्हाचे पीठ विनामूल्य वाटणार !

सध्या पाकध्ये गव्हाच्या पिठाची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे.