स्थळ ठरलेले नसतांनाही ‘सनबर्न’कडून तिकीटविक्रीला प्रारंभ

‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याला प्रोत्साहन, तर सामाजिक न्याय विभागाकडून केले जाते व्यसनमुक्तीचे कार्य !

मद्यबंदीविषयी सर्वपक्षीय सरकारांचे दुटप्पी धोरण !

मद्य प्रोत्साहन विभाग !

‘आज शेतकर्‍यांची दुःस्थिती का निर्माण झाली ?’ वास्तविक सरकारने भारतभरात मद्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेणे सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे. सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचे आणि शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे मार्ग अनेक आहेत. ते सरकारने चोखाळावेत, अशीच जनतेची अपेक्षा !

नाशिक येथे मद्यपी महिलेचा बसमध्ये धिंगाणा 

जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली.

‘सनबर्न महोत्सव’ यंदा ३ ऐवजी ४ दिवस ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !

नाशिक येथे रस्त्यात मद्यपी युवकांचा हिडीस पद्धतीने नाच !

येथील त्र्यंबकेश्वर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच केला. युवकांनी मद्य प्राशन केले होते. एका तरुणाने तर थेट रस्त्यावरच ‘नागीण’ नृत्य केले. ‘रस्त्यात हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे.

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?

पुरुष मद्यप्राशन करण्यामध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर ! – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही या स्थितीत जराही पालट झालेला नाही !

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिबवर गेल्याचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा आरोप आहे.