गोवा : मडगाव रेल्वे परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत ३ गुंडांकडून महिलेवर प्राणघातक आक्रमण

या भागात ‘मथुरा’ नावाचे मद्यालय हे अवैध आहे. या मद्यालयाकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती नाही. हे मद्यालय प्रतिदिन उत्तररात्री २-३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालू असते. याच मद्यालयाजवळ हे आक्रमण झाले आहे.

गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

दारूच्या सेवनामुळे ७ प्रकारच्या कर्करोगांचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.

गोवा राज्यात आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !

आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

दारूच्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्ह्यात ४ पथके

थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !

सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !

महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.

विषारी दारू पिऊन मरणार्‍यांना एक रुपयाही हानीभरपाई देणार नाही ! – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

राज्यात गेली ६ वर्षे दारूबंदी असतांना राज्यात सर्रास दारू कशी मिळत आहे ?, याविषयी ते अपयशी का ठरले ? आणि ठरत आहेत ? तसेच यापुढे हे थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत ?, हेही त्यांनी सांगायला हवे !