सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण चालू 

अवैधरित्या मासेमारी करणार्‍या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.

आळंदीतील ह.भ.प. कोकरे महाराज यांचे उपोषण मागे

तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्‍यांसह समान नागरी कायदा व्‍हावा, सर्वांना विनामूल्‍य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्‍या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्‍हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.

१५ नोव्‍हेंबरपासून महाराष्‍ट्र दौरा, १ डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण !

१५ ते २५ नोव्‍हेंबरपर्यंत महाराष्‍ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी ९ नोव्‍हेंबर या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग : अनधिकृत बांधकामांवरील पक्षपाती कारवाईच्या विरोधात मालवण येथे समुद्रात बेमुदत उपोषण !

बंदर विभाग, प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा बेमुदत उपोषणाचा निर्णय मी घेतला आहे – दामोदर तोडणकर

मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी !

मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवसाचे अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी २ नोव्हेंबर या दिवशी म्हणजे सलग तिसर्‍या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी ‘चक्काजाम आंदोलन’ केले.

आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; साखळी आंदोलन चालूच ठेवणार !

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या; पण आता आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल, तर सरकारला वेळ देण्यास सिद्ध आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, हे सांगावे ! – मनोज जरांगे पाटील

फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्‍हाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्‍हटले आहे.

जुन्या नोंदी आढळल्यास कुणबी दाखले देऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.

अंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली !

२९ ऑक्टोबरपासून गावागावात ‘आमरण उपोषण चालू करा’, असे आवाहन मराठा समाजाला करून ‘कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणीही त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी मराठवाड्यात ४०० हून अधिक गावांमध्‍ये उपोषण चालू !

हिंगोली जिल्‍ह्यातील ५६३ गावांपैकी १०० हून अधिक गावांनी राजकीय नेत्‍यांना गावात प्रवेश बंदी केली.