गोरक्षकांना मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित आणि पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

बोदवड (जिल्हा धुळे) येथील गोरक्षक संजय शर्मा यांचे ३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ चालू !

जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.

‘आशा’ स्वयंसेवकाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सरकार आशा स्वयंसेविकांच्या पाठीशी आहे. आर्थिक सूत्रे येतात, तेव्हा त्यामुळे परिणाम होणार्‍या अनेक गोष्टी पहाव्या लागतात. दोघांनी थोडे पुढे-मागे सरले पाहिजे. चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले.

‘सगेसोयरे’ची अधिसूचना लागू झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही ! – मनोज जरांगे पाटील

‘मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधीच्या अधिसूचनेची कार्यवाही झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम निर्धार मराठा समाजाचे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केला.

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही ! – जरांगे यांची शासनाच्या शिष्टमंडळाला चेतावणी

महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांना शासनाचे शिष्टमंडळ भेटायला गेले होते, त्या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना आक्रमक !

त्यांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिला आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक उपस्थित आहे; परंतु मनोज जरांगे पाटील वैद्यकीय पथकाकडून पडताळणी करून घेण्यास किंवा उपचार करून घेण्यास सिद्ध नाहीत.

सिंधुदुर्ग : अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ९ व्या दिवशीही चालू

आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

सिंधुदुर्ग : मुणगे येथील पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये चालू करायचे काम अद्याप ठप्प !

वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?

Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.