चांदेराई आणि हरचिरी येथील पूर ३६ तासांनी ओसरला : जनजीवन पूर्वपदावर

चांदेराई आणि हरचिरी येथील पूर ३६ तासांनी ओसरला : जनजीवन पूर्वपदावर

दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागांतील पुराचे पाणी ओसरल्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर चालू झाले आहे.

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट मासांत कृष्णा खोर्‍यात अती पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसाह्य करणार आहे.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर !

राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर !

२४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्‍याने पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने त्‍यातून कधीही विसर्ग चालू होण्‍याची शक्‍यता असल्‍याने पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर आहे.

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर

गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर

राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच गावांचा संपर्क तुटला आहे. बर्‍याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पूरस्‍थिती निर्माण होण्‍याची शक्‍यता : प्रशासनाच्‍या सतर्कतेच्‍या सूचना !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पूरस्‍थिती निर्माण होण्‍याची शक्‍यता : प्रशासनाच्‍या सतर्कतेच्‍या सूचना !

जिल्‍ह्यात सातत्‍याने होत असलेल्‍या पावसामुळे जिल्‍ह्यातील स्‍थिती गंभीर होत आहे. कोल्‍हापूर-गगनगिरी, तसेच कोल्‍हापूर-आंबोली मार्ग बंद असल्‍याने कोकणात जाण्‍यासाठीचा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्‍या (३९ फूट) जवळ पोचत आली असून आज पंचगंगा नदीची पातळी ३८ फूट नोंदवली.

गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले

गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले

गोव्यात पावसाने आता २ सहस्र मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे आणि २०.५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांखळीमध्ये सर्वाधिक १७१.६ मिमी पाऊस पडला. त्यानंतर पेडणे, म्हापसा, पणजी आणि काणकोण यांचा क्रमांक लागतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.