‘जलयुक्त शिवार योजने’मुळेच मराठवाडा येथे जलप्रलय ! – एच्.एम्. देसरडा, अर्थतज्ञ

अर्थतज्ञांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मराठवाड्यात आलेल्या पुराचे दायित्व कोण घेणार ? तसेच पुरामुळे झालेली हानी कोण भरून देणार ? नागरिकांना झालेला मनस्ताप कोणत्याही गोष्टीने भरून निघणार नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?

‘गुलाब’ वादळामुळे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची हानी !

मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्‍यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पूरस्थितीची पहाणी करण्यास गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वागत मिरवणुकीत व्यस्त !

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील अन् सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात अतीवृष्टीने झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी बीड जिल्ह्यात गेले होते. या वेळी परळी येथील नागरिकांनी पाटील यांचे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.

मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !

पिकांच्या हानीमुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !

अन्नदात्या शेतकर्‍यांचा आक्रोश !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..

न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

कधीही पूर न आलेल्या चाळीसगाव येथील ढगफुटी म्हणजे भीषण आपत्काळच होय !

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस !

पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवासेनेच्या वतीने पूरग्रस्त महिलांना साडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते. 

सातारा येथे पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्यासाठी शिक्षण विभागाचे महसूल विभागाला पत्र !

शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.