
अमरावती – ४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतातही पाणी शिरले. अनेक गावांतील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून बंद आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे तेथील नाल्याची अपेक्षित खोली झाली नाही. त्यामुळे नाल्यांवरून पाणी वहात आहे. हैदतपूर वडाळा येथेही नाल्याला आलेल्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक