
अमरावती – ४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतातही पाणी शिरले. अनेक गावांतील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून बंद आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे तेथील नाल्याची अपेक्षित खोली झाली नाही. त्यामुळे नाल्यांवरून पाणी वहात आहे. हैदतपूर वडाळा येथेही नाल्याला आलेल्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !