जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !

हुतात्मा अजय ढगळे यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले.

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् यांचे निधन

गोविंद भरतन् हे ‘भारतीय वाक्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष होते. मंदिरांशी संबंधित अनेक खटले त्यांनी लढवले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते नेहमी सहभागी होत असत.

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी,  राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक  

भारतीय सेना दलाच्या सैनिकांना प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारका’चे कार्याध्‍यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !

भारताच्‍या स्‍वातंत्र्यप्राप्‍तीसाठी ३ भावंडे आणि त्‍यांच्‍या पत्नींनी संपूर्ण आयुष्‍य समर्पित केले. असे एकमेव उदाहरण म्‍हणजे सावरकर कुटुंब. बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर आणि स्‍वातंत्र्यवीर विनायक सावरकर अशी ही ३ भावंडे होती.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर (वय ८४ वर्षे) यांचे २१ मार्च या दिवशी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ६ जण ठार !

अपघात १२ मार्च या दिवशी सकाळी झाला. चारचाकी वाहन हे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ‘डिव्हायडर’मध्ये घुसून ३-४ पलट्या मारून दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर उलटले.

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.