दारूबंदी असून बिहारमधील पुरुष दारू पिण्यात देशात पुढे !

दारूबंदी असतांनाही तेथील पुरुषांना दारू मिळतेच कशी ? अशा प्रकारे दारू पिण्यात बिहार पुढे असणे, हे तेथील शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पदच होय !

भारताविरोधातील आक्रमकता थांबवण्याचा अमेरिकेचा चीनला सल्ला

अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनात नक्षलवादी समर्थकाचे छायाचित्र कसे ? शेती आणि शेतकरी यांच्याशी त्याचा काय संबंध? – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रश्‍न

देहली येथील शेतकरी आंदोलनांमध्ये खलिस्तानी आणि नक्षलवादी यांचे समर्थक घुसले आहेत, हे विविध वाहिन्यांवरील वृत्तातून समोर येत आहे. याविषयी आता केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे, तसेच शेतकरी संघटनांनी याविषयी जाहीरपणे स्पष्टीकरण दिले पाहिजे !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !

भारताच्या वर्ष २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते, अशी माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी दिली आहे.

गांधीवादी विचारसरणीचा त्याग केल्याने भारतीय क्रिकेट संघ यशाच्या शिखरावर !- ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया

भारताच्या शासनकर्त्यांनीही गांधींच्या विचारसरणीचा त्याग करून आक्रमक पवित्रा घेतला, तर भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारत देशही यशाच्या शिखरावर पोचेल !

भारताच्या शस्त्रसंधी कराराच्या कथित उल्लंघनावरून पाकने भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला !

भारतीय सैन्याकडून शस्त्रसंधी कराराचे कथितरित्या उल्लंघन केल्यावरून पाकने तेथील भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला.

भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ

मलेशियातील रोहिंग्यांची आतंकवादी संघटना भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !  

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रतिदिन नवनवीन देशविरोधी कारवायांसमोर येत असतांना ‘तिच्यावर सरकार बंदी का घालत नाही ?’ असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

युद्धासाठी भारत आता १० ऐवजी १५ दिवसांचा शस्त्रसाठा ठेवणार

भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती.

प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा आज बंद

स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?