संभाजीनगर येथे ‘ईडी’च्या विरोधात शिवसेनेची निदर्शने !

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने केलेली  कारवाई आणि केंद्र सरकार यांच्या निषेधार्थ शहरात १ ऑगस्ट या दिवशी शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली. आगामी काळात ‘ईडी’च्या विरोधात आरपारची लढाई लढू, अशी चेतावणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या वेळी दिली.

औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामकरण याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे; मात्र दोन्ही याचिकांवर न्यायालयाने १ ऑगस्ट या दिवशी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

जिहादी अर्थपुरवठा !

भारतातील जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (‘पी.एफ्.आय.’ला) इस्लामी देशांतून प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला जातो, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए’च्या) सूत्रांकडून सांगण्यात आल्यानंतर हिंदूंना धक्काच बसला आहे.

जिभेचे चोचले ?

सध्या अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ मागवल्या जातात. त्यातीलच ‘खाद्यपदार्थ’ हे सूत्र सर्वांच्या जवळीकीचे आहे. त्यामुळे अल्पाहार आणि जेवण ऑनलाईन पद्धतीने मागवणे किंवा जवळच्या उपाहारगृहातून ते घेऊन येण्याचे प्रमाण दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे.

गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास सातारा नगरपालिकेची संमती !

राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे; मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा नाही, हे क्लेशदायक आहे. यासाठी  पुतळ्याची मागणी करण्यात आली होती.

हिंदूंनो, हिंदुद्वेष्ट्यांपासून सावध रहा !

चातुर्मासात सश्रद्ध भाविक व्रतवैकल्ये मनोभावे साजरी करत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून हिंदुद्वेष्टे बुद्धीभेद करणारे संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत असतात. सध्या नागपंचमीनिमित्त बुद्धीभेद करणारा संदेश प्रसारित होत आहे.

हिंदूंनी मुलांना हिंदुस्थानचा भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, इंदूर, मध्यप्रदेश

हिंदुस्थानातील हिंदूंची भूमी ही हिंदूंचे राष्ट्र आहे. इतिहास हा राष्ट्राचे भविष्य ठरवतो. इतिहासाची संपूर्ण माहिती असल्याविना आपण लढू शकणार नाही; कारण इतिहास आपल्या जीवनाशी जोडलेला आहे.

निधन वार्ता

कळवा येथील सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या अंजली सुरेश पाटील यांच्या आई श्रीमती प्रमिला बळीराम इंगळे (वय ८७ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

बद्धकोष्ठता : आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. यासह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे, ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या..