सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाले नसल्यास ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायदा लागू होणार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमाती यांविषयीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले, ‘सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाले, तरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रोसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करता येणार आहे.’

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस आणि नन सेफी यांना जामीन संमत

थिरूवनंतपूरम् येथील नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील वर्षी होणार ‘जी-२०’ समुहाची बैठक

वर्ष २०२३ मध्ये भारत ‘जी-२०’ या समुहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यामुळे या बैठकीचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने ५ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे.

पाकिस्तानात सासर्‍याने स्वतःच्या सुनेला कुर्‍हाडीने वार करून ठार केले !

कराची येथील मुख्तार अहमद नामक मुसलमानाने स्वतःच्या सुनेला कुर्‍हाडीने वार करून ठार केले.

तृणमूल काँग्रेसचे नेते अनारूल हुसैन हेच मुख्य सूत्रधार ! – सीबीआय

लोकांना जिवंत जाळण्यास कारणीभूत असलेल्या अनारूल हुसैन यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकामध्ये कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

दिव्याखाली अंधार !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अररिया (बिहार) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञात धर्मांधांनी केली मूर्तीची नासधूस

काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला.

शिवसेनेचे आमदार असूनही आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची दारे बंद होती !

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची दारे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही प्रवेश मिळाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून..

वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगल घडवणाऱ्या ५ नव्या आरोपींना अटक !

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तान्यांनी वर्ष १९८४ मध्ये केलेल्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. यातील ५ नव्या आरोपींना कानपूर येथून अटक करण्यात आली आहे.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल; मात्र आमदारांनी २४ घंट्यांत मुंबईत यावे ! – खासदार संजय राऊत

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी आमदारांची इच्छा असेल, तर आम्ही बाहेर पडू; मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ घंट्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले.