हुसैन यांनी पोलिसांना सांगितले, ‘‘गाव जळत आहे, ते जळू दे, तुम्ही येण्याची आवश्यकता नाही !’’
बंगालच्या बीरभूम अग्नीकांडाचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – राज्यातील बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची हत्या झाल्यावर २१ मार्चच्या रात्री त्यांच्या समर्थकांनी तोडफोड करून, तसेच आग लावून केलेल्या हिंसाचारात १० लोकांचा जळून मृत्यू झाला होता. याचे अन्वेषण करणार्या केंद्रीय अन्वेषण विभागाने ९० दिवसांनंतर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या आरोपपत्रानुसार रामपूरहाटचे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनारुल हुसैन हे या आक्रमणाचे मुख्य सूत्रधार आहेत.
Birbhum killings, in which 10 people were burnt alive including minors, CBI has found that it was ordered by TMC leader Anarul Hossain. He also supervised it and kept the police away. pic.twitter.com/OqrMCO6S9T
— Facts (@BefittingFacts) June 23, 2022
शेख यांची हत्या झाल्यानंतर हुसैन यांनीच तेथे जमा झालेल्या शेख यांच्या समर्थकांना हिंसा करण्यासाठी चिथावणी दिली होती, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यासह हुसैन यांनीच पोलिसांना दूरभाष करून सांगितले होते, ‘‘गाव जळत आहे, ते जळू दे, तुम्ही येण्याची आवश्यकता नाही.’’ अन्वेषण विभागाने दावा केला आहे की, गावातील अनेक लोकांनी अनारूल हुसैन यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना बोलावण्याची विनंती केली होती; परंतु हुसैन यांनी लोकांना साहाय्य केले नाही, उलट पोलिसांना न येण्याविषयी सांगितले.
संपादकीय भूमिका
|
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी