मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने त्यांना पकडण्यासाठी लावले पिंजरे !
महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !
महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !
सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करून सदरची माहिती अद्ययावत करावी आणि त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात.
बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कुठेही बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा.
सगेसोयर्यांच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारला वेळ द्या. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे; मात्र आधी तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली.
विधानसभा इमारतीच्या छताला अनेक ठिकाणी पुन्हा गळती लागली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गळती रोखण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्चून ‘वॉटर प्रूफ्रिंग’चे काम (पाणी झिरपण्यापासून रोखण्याचे काम) हाती घेतले आहे..
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना मोठ्या आवाजातील ध्वनी ऐकू येत नाही कि ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात ?
भ्रमणभाषमधील खेळांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार्या तरुण पिढीला पालकांनी दिशा देणे आवश्यक ! पालकांनी ‘पबजी’च्या अतिरेकाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या मुलांना वेळीच सतर्क करावे !
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तळोदा आणि नंदुरबार येथे केली आहे.
पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची पहाणी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.