भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

युरोपीय संघाकडून भारताला नव्हे, तर पाकच्या बासमती तांदळाला ‘जीआय’ टॅग !

बासमती तांदळाचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. हा तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

सांगलीत वेश्या व्यवसाय चालणार्‍या हॉटेलवर धाड; आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अटकेत

ज्यांच्यावर समाजात घडणारे गुन्हे रोखण्याचे दायित्व असते, तेच पोलीस अधिकारी जर वेश्या व्यवसायासारख्या प्रकरणात सापडत असतील, तर अशांकडून गुन्हा रोखण्याची अपेक्षा काय करणार ?

पर्यटनवृद्धीसाठी केलेल्या ‘इव्हेंट’च्या आयोजनात गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विरोधकांनी शासनाला धारेवर धरले

राज्य पर्यटन खात्याने देशविदेशात पर्यटनवृद्धीसाठी ‘इव्हेंट’चे आयोजन केले. या आयोजनात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विरोधकांनी धारेवर धरले.

(म्हणे) ‘सरकार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या विरोधात पोलीस बळाचा वापरत करत आहे !’ – मनोज परब, नेता, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’

मनोज परब म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’

‘आप’च्या जिल्हा परिषद सदस्याने बनावट ‘जात’ दाखला दिल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने अपात्रता याचिका प्रविष्ट

‘आप’चे गोव्यातील एकमेव जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी बनावट ‘जात’ दाखला देऊन जिल्हा पंचातय निवडणूक लढवल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी एका याचिकेद्वारे केली आहे.

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली ! – महालेखापालांचे ताशेरे

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात (लक्झरी टॅक्स) नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली. ही माहिती ‘कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग) यांच्या ‘ऑडिट’ अहवालात नमूद केली आहे. ‘कॅग’ने हा ‘ऑडिट’ अहवाल २९ जानेवारी या दिवशी विधानसभेत मांडला आहे.

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी करणारा ठराव २३ विरुद्ध ८ मतांनी फेटाळण्यात आला

फोंड्याचे आमदार रवि नाईक यांनी सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांचा मिळून राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. हा ठराव अखेर २३ विरुद्ध ८ मतांनी विधानसभेने फेटाळला.

खासदार आणि आमदार यांच्या नावाने दूरभाष करून फसवणुकीचा प्रयत्न करणार्‍या एकाला अटक

पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हे करण्याचे गुन्हेगाराचे असे धाडस झाले नसते.