अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येत नसेल, तर भाजपने हिंदु प्रदेश निर्माण करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

काश्मीरमध्ये हिंदू अल्प झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. इस्लाम धर्मियांच्या वाढत्या संख्येला वेसण घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा त्वरित आणावा.

मुंबई येथे प्रेमसंबंधातून धर्मांधाकडून युवकाची हत्या 

एका घटस्फोटित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून मुबारक प्यारेजहान सय्यद या २० वर्षीय धर्मांधाने आरे कॉलनी येथे रवी साबद या युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुबारक याच्यासह अमित शर्मा नावाच्या युवकाला अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस

भोसरी (पुणे) येथील भूखंड अपहाराच्या प्रकरणी त्यांना ३० डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आत्महत्येसाठी अनुमती देत नसाल, तर नक्षलवादी होईन !

वडिलांनी शेतीसाठी घेतलेले पीककर्ज न फेडल्याने शिक्षणासाठी धडपडणार्‍या वैभव याला अधिकोषांनी कर्ज नाकारले. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश होऊन त्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची अनुमती मागितली आहे.

येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल ! – महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभाग

राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा येथे सभा घेण्यास राज्यशासनाची बंदी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा येथील स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यास राज्यशासनाने बंदी घातली आहे. यासह स्तंभाच्या ठिकाणी प्रवेशावर, तसेच पुस्तक, खाद्यपदार्थ आणि अन्य कक्ष उभारणे यांवरही निर्बंध घालण्याची सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, मेजवान्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारे…

सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना

सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे विशेषत: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. या ८ प्रकरणांमधील ६ घटनांचा पोलिसांनी छडा लावला आहे, तर उर्वरित २ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण चालू असलेली प्रकरणे चालू मासातच नोंद झाली आहेत.

गोवा अन्नधान्यात स्वावलंबी बनेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आत्मनिर्भर भारतासमवेत स्वयंपूर्ण गोवा सिद्ध करणे हे शेतकर्‍यांच्या हाती आहे. भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. कृषी व्यवस्थेतील दलाली भाजपने बंद केली आहे. शेतकर्‍यांच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्यात गोवा स्वावलंबी बनेल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी इन्सुली तपासणी नाक्यावर विशेष पथक तैनात

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.