लवकरच शिर्डी साईमंदिरात हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार !

लवकरच शिर्डी साईमंदिरात २ वर्षांपूर्वी घालण्‍यात आलेली हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्‍थानच्‍या तदर्थ समितीने बंदी हटवण्‍यासंदर्भात अनुकूलता दर्शवली

गोवा मंत्रीमंडळात १० मेपूर्वी पालट होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१४ सप्टेंबर २०२२ या दिवशी काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामधील काही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सडक्‍या सफरचंदांच्‍या वापरातून सिद्ध केलेल्‍या रसाची विक्री !

नवी मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये व्‍यापार्‍यांनी फेकून दिलेल्‍या सडक्‍या सफरचंदांचा रस करून तो विकण्‍यात येत आहे. हे एका व्‍हिडिओद्वारे उघड झाले.

‘स्वयंपूर्ण’ गोव्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साळगाव पंचायतीत ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने राज्यातील पंचायती आणि पालिका यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना हे आवाहन केले.

गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.

पुणे येथील ‘कॉसमॉस बँक सायबर आक्रमण’ प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा !

गुन्‍हेगारांनी गणेशखिंड येथील ‘कॉसमॉस बँके’च्‍या मुख्‍यालयातील ‘सर्व्‍हर हॅक’ करून ११ ते १३ ऑगस्‍ट २०१८ या कालावधीमध्‍ये ९४ कोटी रुपये काढून घेतले होते.

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये !

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये आहे. जिल्‍ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्‍के आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवरील औरंगाबाद नाव पालटू नका ! – मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ‘नामांतराविषयी अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी कागदपत्रांवर पालटू नका’, अशा सूचना केल्‍या आहेत.

वाल्‍मीकि रामायण ही विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवस्‍थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी कथा ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वाल्‍मीकि रामायणात सर्व मानवी मर्यादांचे पालन करतांनाही, कशा प्रकारे तुम्‍ही प्रेम, धर्म, कर्तव्‍य यांचे पालन करू शकता याचे योग्‍य उदाहरण दिले आहे. यामुळेच लोकांनी विशेषकरून तरुण पिढीने ‘वाल्‍मीकि रामायण’ अवश्‍य वाचले पाहिजे,असा सल्लाही त्‍यांनी दिला.

कराड येथे जल्लोषपूर्ण वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पार पडली !

पारंपरिक शिवजयंती उत्‍सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्‍या वतीने प्रतिवर्षी काढण्‍यात येणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते.