सांगवे येथे अपघातात २ ठार, ४ जण घायाळ

तालुक्यातील केळीचीवाडी, सांगवे येथे दुचाकी आणि रिक्शा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री आणि परशुराम अनंत पांचाळ हे दोघे जागीच ठार झाले

राजापूरचे वाहतूक नियंत्रक एस्.टी. सेवेतून बडतर्फ

बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !

म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हादई जलतंटा लवादाने म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी निवाडा यापूर्वी दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत !

मेहबूबा मुफ्ती यांची वर्षभरानंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यावर त्यांनी देशद्रोही विधाने करण्यास चालू केली होती. त्यामुळे त्यांना आजन्म नजरकैदेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येत होते.

वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.

आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !

अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

कुडचडे येथे भर बाजारातील दुकाने फोडून चोरी

अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.

गोव्याच्या पर्यटन धोरणाला चर्च संस्थेचा विरोध

राज्याचे पर्यटन धोरण हे गोवा आणि गोमंतकीय यांच्या हितासाठी नाही. हे पर्यटन धोरण स्थगित ठेवावे, अशी मागणी चर्च संस्थेशी निगडित ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम्’ने गोवा शासनाकडे केली आहे.

गोव्यात पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा विद्यालयांना आदेश

पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.