वणीत कापसाची आवक घटली

बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे.

मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

सिन्नर (नाशिक) येथील सहकारी संस्थेसह एका खासगी आस्थापनाच्या आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

ईडीच्या या कारवाईच्या वृत्ताला शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

वेळेत अग्नीशमनाचा बंब न मिळाल्याने ७ एकरवरील उसाची हानी

बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ?

दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांचे देहलीच्या सीमेवर आंदोलन

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यांतील शेतकर्‍यांनी ‘चलो देहली’ आंदोलन चालू केले आहे; मात्र त्यांना देहलीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. त्यामुळे या सीमेवर सैन्य छावणीचे स्वरूप आले आहे.

६० वा गोवा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपयांच्या साहाय्याची मागणी !

गोवा राज्य ६० वा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे गोवा आणि देशभर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन सर्वांना घडवले जाणार आहे.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे नाकारल्याने तिला पळवून नेणार्‍या धर्मांध तरुणाला जामीन

उत्तरप्रदेश सरकार एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवत आहे, तर दुसरीकडे पोलीस त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत ! अशाने कधीतरी धर्मांधांवर वचक निर्माण होईल का ?

कळंबणी बु. (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि दानपेटीतील रकमेची चोरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! हिंदूंच्या धार्मिक स्थानांच्या संदर्भात अशा घटना सातत्याने घडणे, हे हिंदूबहुल भारतासाठी लाजिरवाणे !

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला होत असलेल्या विरोधाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना माहिती देण्यात आली आहे