
सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती. त्याचप्रमाणे सातार्डा-सातोसे मार्गे बांदा ही बसगाडीही बंद आहे अन् तसेच तालुक्यातील इतरही वस्तीच्या गाड्या बंद आहेत. कोरोना काळात दळणवळण बंदी होती. या बंद गाड्यांमुळे शाळकरी मुले, कामगार आणि गावठी भाजीपाला विक्रेते यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. येत्या ८ दिवसांत या गाड्या सुरळीत चालू कराव्यात, अन्यथा सावंतवाडी आगारासमोर शाळकरी मुले तसेच सर्वसामान्य जनता यांना घेऊन उपोषण छेडण्यात येईल, अशी चेतावणी तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. या वेळी येत्या २ ते ४ दिवसांत बसगाड्या चालू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख पडोळे यांनी दिले.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट