
उन्नाव (उत्तरप्रदेश) – शेतकर्यांचा विरोध कृषी कायद्यांना केला जात नसून निशाणा एकीकडे असला, तरी हेतू काही वेगळाच आहे. खरे दु:ख नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांचे आहे. कलम ३७० हटवल्यामुळे जो त्रास झाला आणि अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामांचे जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा खरा त्रास आहे. उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्यांच्या आंदोलनावर केली. ‘आंदोलक शेतकर्यांपैकी अनेकजण हे मोठे व्यापारी आहेत’, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांतील शेतकर्यांचा विरोध !
साक्षी महाराज पुढे म्हणाले की, खरे सांगायचे, तर खरा शेतकरी हा शेतात राबत आहे. तुम्हाला खरे शेतकरी पहायचे असतील, तर मुराबादमधील शेतकरी संमेलनात चला. मी तुम्हाला खरे शेतकरी दाखवतो. आंदोलनकर्त्यांपैकी काही ५०० बिघा (४ बिघा म्हणजे १ हेक्टर) भूमीचे मालक आहेत, तर काही सहस्र बिघा भूमीचे मालक आहे. अशाच लोकांच्या पोटात नवीन कृषी कायद्यांमुळे पोटशूळ उठला आहे. सर्व देशामध्ये केवळ २ – ३ तीन ठिकाणी आंदोलन चालू आहे. पंजाबमधून लोक सिंघू सीमेवर येत आहेत. हरियाणा आणि राजस्थान येथूनही देहलीच्या सीमेवर शेतकरी येत आहेत; कारण दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !